मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !
मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !
सावळेश्वर(मोहोळ) - शेतकरी, महिला,विद्यार्थी व कष्टकरी लोकांना न्याय मिळण्याचे ठिकाण म्हणजे सावळेश्वर मंडळ अधिकारी कार्यालय.
सरकारी कार्यालयात जायचे म्हटले की सामान्य माणूस डोक्याला हात लावतो.सरकारी कार्यालयात पैसे खर्च करून वरून हेलपाटे मारून सामान्य नागरिक हैराण होतो.
सरकारी कार्यालय म्हटलं की तोंड वाकडं होत. परंतु मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर मंडल अधिकारी कार्यालय हे याला अपवाद ठरत आहे.
वृद्ध महिला, निराधार महिला, विद्यार्थी, शेतकरी यांच्या एका दिवसात अडचणी सोडविण्याचे काम या भागात होत आहे. आलेली प्रकरणे थेट मार्गी लागत आहेत. यामुळे या भागातील नागरिक समाधानी असल्याचे सांगितले जाते.
सावळेश्वर विभागाचे मंडल अधिकारी असलेले प्रकाश दळवी हे सामान्य लोकांच्या प्रश्नांना प्रथम प्राधान्य देताना दिसून येतात.अशा प्रकारचे अधिकारी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात असले पाहिजेत असे मत सामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.
त्यांचा सारखा अधिकारी 'का' गरजेचा ? हे खालील घटनेवरून लक्षात येईल!!
दोन वर्षांपूर्वी शिरापूर येथील एक मुस्लिम व्यक्ति मयत झाल्यानंतर दफन करण्यासाठी गाव पातळीवर वाद निर्माण झाल्यामुळे सदरचे प्रेत तहसील कार्यालय मोहोळ येथे आणून ठेवण्यात आलेले होते. मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांना त्यावेळी हस्तक्षेप करावा लागला होता. त्यानंतर सदर प्रेताची दफन करण्याची कारवाई करण्यात आली होती.
सद्यस्थिती शिरापूर येथे दफनभूमीचा विषय आजही प्रलंबित असून ६ डिसेंबर रोजी रात्री एका मुस्लिम समाजाची वृद्ध महिला मयत झाल्यामुळे पुन्हा सदरचा प्रश्न ऐरणीवर आला होता. यामध्ये महसूल प्रशासनाच्या वतीने मंडल अधिकारी प्रकाश दळवी हे स्वतः सकाळी सहा वाजल्यापासून थांबून होते. मुस्लिम समाज यांच्यामधील वाद विकोपाला गेला होता. मुस्लिम समाज सदरचे प्रेत जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे घेऊन जाणार होते.
परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने गावकऱ्यांच्या मध्यस्थीने सामाजिक सलोखा राखून सायंकाळी चार वाजता सदरचे प्रेत हे यापूर्वी ज्या ठिकाणी पारंपारिक पद्धतीने दफन केलं जायचं त्या ठिकाणी दफन करण्यात आले. या प्रकारात मंडल अधिकारी प्रकाश दळवी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळाले. अन्यथा खूप मोठ्या प्रमाणात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजिकतेला गालबोट लागण्याचा प्रकार घडणार होता.
सदरील घटना अत्यंत संवेदनशील होती. मंडळ अधिकारी प्रकाश दळवी यांच्या मध्यस्थीने दोन्ही समाजातील होणारा वाद टळला गेला.
तसेच सध्या प्रलंबित असलेल्या दफनभूमीच्या विषयाबाबत सर्व विभाग व शिरापूर येथील ग्रामस्थ यांची दिनांक १० रोजी मंगळवारी सायंकाळी चार वाजता तहसीलदार यांच्या दालंना मध्ये बैठक आयोजित करण्यात आलेले आहे.
प्रशासनाच्या तत्परतेमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित
राहिली.मंडळ अधिकारी प्रकाश दळवी यांनी मोठ्या शिताफीने प्रकरण मार्गी लावले.
असे प्रामाणिक व कर्तव्य दक्ष अधिकारी क्वचित प्रमाणात मिळतात. हे शिरापूर व परिसरातील नागरिक सांगत होते.
मंडळ अधिकारी प्रकाश दळवी यांच्या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरील घटने प्रसंगी महत्वाची भूमिका बजावत असताना मंडल अधिकारी प्रकाश दळवी व संबंधित अधिकारी यांचे छायाचित्रे..
Comments
Post a Comment