बीबी दारफळ करांनो सावधान... तळे भरल्यास पाण्यावर नियंत्रण नाही... काळजी घ्या...!

गांधी तलाव पुर्ण भरण्याच्या मार्गावर ; अतिरिक्त पाऊस आल्यास मोठा धोका!


उत्तर सोलापूर तालुका (बीबी दारफळ) -  गांधी तलाव बीबी दारफळ येथील पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. मुसळधार पावसामुळे तलाव क्षमतेपेक्षा अधिक भरत जाणार आहे. याच अनुषंगाने लघु पाटबंधारे विभागाने गावाला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लघु पाटबंधारे विभागाच्या पत्रात पुढील उल्लेख केला आहे..

उपरोक्त विषयांस अनुसरून आपल्या अवलोकनार्थ आणण्यात येते को, या शाखा कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील ल.पा. तलाव बी.बी.दारफळ, ता. उत्तर सोलापूर या प्रकल्पामध्ये दि. १३/०६/२०२५ रोजी एकूण ८७.८९% इतका पाणीसाठा झालेला आहे.


गेल्या काही दिवसांपासून प्रकल्पाच्या पाणलोट व मुक्त पाणलोट क्षेत्रात विशेषतः नान्नज ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. असेच पाण्याचा प्रवाह सुरु राहील्यास धरण १००% झाल्यास धरणास मुक्त वहन पध्दतीचे सांडवे असून, अनियंत्रित आहेत. प्रकल्पामध्ये पूर्ण संचय पातळीपर्यंत पाणीसाठा झाल्यानंतर अतिरिक्त झालेल्या पाण्यावर नियंत्रण ठेवणे शक्य नाही. तसेच, सदर वाहून जाणारे अतिरिक्त पाण्यामुळे बी. बी. दारफळ व परिसरात असलेले स्थानिक ओढे, नाले व इतर नैसर्गिक प्रवाह यामध्ये मिसळल्याने सखल भागात पाणी जाण्याची शक्यता आहे. तसेच पाणी प्रवाहामुळे बी. बी.दारफळ ते रानमसले हे पुल पाण्याखालील जाऊन वाहतूक बंद होऊ शकते.

सबब, या पत्राव्दारे आपणास विनंती करण्यात येते की, बी.बी.दारफळ व परिसरातील गावातील लोकांना आपले स्तरावरुन सतर्कतेचा इशारा देण्यात यावा ही विनंती.

हे आपले माहितीसाठी व पुढील कार्यवाहीसाठी सविनय सादर.




Comments

Popular posts from this blog

🛑ब्रेकिंग ! 'वाघ' उत्तर तालुक्यातील' कळमन' गावात आढळला !

'चिकन' खाणाऱ्यांनो सावधान; सोलापूर शहरात 'बर्ड फ्ल्यू' ची लागण!

मोहोळ तालुक्यातील 'सावळेश्वर मंडळ' सध्या चर्चेचा विषय ठरतोय !